आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. आपले वजन वाढण्यामागे काही महत्त्वाचे कारण सुद्धा आहेत. बहुतेक वेळा सध्याची बदललेली परिस्थिती आणि जीवनशैली यामुळे आपण केव्हाही काही पदार्थ खात असतो आणि सध्या आपल्यापैकी प्रत्येकजण घरी बसून काम करत असल्याने आपल्या शरीराची हालचाल सुद्धा होत नाही, अशा वेळी एकाच ठिकाणी तासन्तास बसून राहिल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरात ल”ठ्ठ”पणा निर्माण होऊ लागतो.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला बोराचे पान लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला बोराचे पान मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायचे आहे जेणेकरून या पानांवर जर कोणत्याही प्रकारचे जीवजंतू असतील तर ते जीवजंतू यामुळे निघून जातील आणि त्यानंतर आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि या ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला बोराचे सात ते आठ पाने टाकायची आहेत आणि आपल्याला हे मिश्रण रात्रभर तसेच भिजवून ठेवायचे आहे.
सकाळी उठल्यानंतर गाळणी च्या सहाय्याने हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि उपाशीपोटी आपल्याला या पाण्याचे सेवन करायचे आहे, असे आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दिवसभरातून दोन वेळा करायचा आहे. हा उपाय आपण महिनाभर जरी सातत्याने केला तरी आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी वाढलेली आहे, ल”ठ्ठ”पणा निर्माण झालेला आहे व वजन वाढले आहे ते पूर्णपणे कमी होणार आहे यामुळे काही दिवसांमध्ये तुम्ही सडपातळ व्हाल.
हा उपाय करताना आपल्याला रात्री ग्लासवर झाकण व्यवस्थित राहील याची काळजी सुद्धा घ्यायचे आहे अन्यथा जर कोणतेही कीटक जर याच्यामध्ये गेले तर आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. रात्रभर पाण्यामध्ये हे पान ठेवल्यामुळे पानातील जे काही घटक असतात , पानाचे अर्क असतात ते या पाण्यात उतरतात. हा उपाय अतिशय साधा सोपा असून तितकाच प्रभावी आहे म्हणून आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी हा उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
